Skip to main content

Featured

कनकादित्य सूर्य मंदिर कशेळी

मित्रांनो, दिवाळीच्या सुट्ट्यांमध्ये कोकणच्या निरागस आणि दिव्यभूमीला स्पर्श करण्याचा योग आला. आदित्य म्हणजे सूर्य. तसे सूर्य मंदिर भारताबाहेरही आढळतात. त्यापैकी भारतात ओडिशा राज्यातील कोर्णाकचे सूर्यमंदिर तर जगप्रसिद्ध आहेच. त्याचबरोबर सौराष्ट्रात (गुजरात) वेरावळ बंदराजवळ प्रभासपट्टण येथे फार प्राचीन सूर्यमंदिर आहे. १२९३ मध्ये अल्लाउद्दीन खिलजी सौराष्ट्रावर चाल करून आला. त्या वेळी प्रभासपट्टणच्या सूर्यमंदिरात वेगवेगळ्या आसनांवर बसलेल्या बारा सूर्यमूर्ती होत्या जे बारा महिन्याचे प्रतिक होते. हल्ल्याची आगाऊ बातमी मिळाल्यामुळे तेथील पुजाऱ्याने दक्षिणेकडे जाणाऱ्या वेरावळच्या एका व्यापाऱ्याच्या गलबतावर त्यातील काही मूर्ती चढवल्या व तो व्यापारी त्या मूर्ती घेऊन दक्षिणेकडे निघाला. फक्त येथील परिस्थिती शांत झाल्यावर तू त्या मूर्ती परत आन अशी सूचना पुजारीने त्या व्यापाऱ्याला सांगितले. ते गलबत कशेळी गावाच्या समुद्रकिनाऱ्यापाशी आले असता अडकले, पुढे जाईना भरपूर प्रयत्न केले पण जहाज काय जागचे हलेना शेवटी त्या व्यापाऱ्याच्या मनात आले की, कदाचित देवाची येथेच राहण्याची इच्छा आहे. म्हणून त्याने एक मूर्...

राजा मानसिंगाची शोकांतिका..

 


अकबरकालीन राजा मानसिंग पहिले जयपूरचे राजे आणि एक प्रभावी आणि शक्तिशाली नेतृत्व ज्याने तमाम रजपूत राजांना मोगलांकडे वळविले. 

महाराणा प्रताप वरील अनेकदा मोहीम फसल्यावर अकबराने सरसेनापती म्हणून राजा मानसिंग यांना मैदानात उतरवले. त्या हल्दि घाटिच्या युद्धात मिळवलेल्या विजयाने राजा मानसिंग मोगल दरबारात उच्चपदाला पोचले.

कबूलची मोहीम, बिहार आणि ओरिसा मधील मोहीम अशा अनेक युद्धाचे नेतृत्व त्यांनी केले. एवढेच नाही तर बंगाल, बिहार आणि ओरिसा हे प्रांत जिंकून मोगल साम्राज्यात आणण्याची मोठीच जबाबदारी राजा मानसिंग यांनी अकबराच्या काळात पार पाडली.

अकबर बादशहाने या थोर सेनापतीचा सन्मानही मोठाच केला. दरबारातील नवरत्नांपैकी ते एक होते. कधी प्रमुख सेनापतीपद तर कधी बंगाल, बिहार, ओरिसा, झारखंड अशा सुभ्यांची सुभेदारी देऊन अकबर बादशहाने त्यांचा सन्मान राखला. तसे मानसिंगाच्या आत्या जोधाबाई ही अकबराची राणी तर मानसिंग यांची बहीण मानबाई ही जहांगीर ची राणी, त्यामुळे नातेसंबंधही खासाच होता.

असे हे जयपूरचे राजे आणि मोगल साम्राज्यातील बुलंद असामी मानसिंग मात्र जहांगीरच्या काळातच मागे पडले.

राजकारणात कसे गरजेनुसार व्यक्ती आणि व्यक्तिमत्व बदलत जाते पहा..

जहांगीरने राजा मानसिंगची दक्षिणेमध्ये अचलपूर येथे बदली केली. अचलपूर ही वऱ्हाड सुभ्याची राजधानी.

मानसिंगला मोगल सेनापती अब्दुल रहीम खानेखाना याच्या हाताखाली नेमण्यात आले. राजा मानसिंग हा वयाने आणि दर्जाने खाना पेक्षा मोठा होता. राजकारणातील एवढ्या प्रगाढ धुरंधर माणसाला आपल्या हाताखाली मुक्रर करावे याचा खानाला खेद वाटला.

एका प्रसंगी अहमदनगरच्या मलिक अंबरशी मोगलांचा लढा चालू होता. त्यावेळी राजा मानसिंग याने खानेखाना याला विचारले, "खानसाहेब ही मोहीम तडाखून संपविता येण्यासारखी आहे. यात दिरंगाई चे कारण काय..? तेव्हा खानेखाना म्हणाला, "तुम्ही ओरिसा जिंकला आणि तुम्हाला माझ्या हाताखाली नेमण्यात आले. मी ही मोहीम जिंकली तर मला कुणाच्या हाताखाली काम करावे लागेल म्हणून ती दिरंगाई..."

.. अर्थात राजकारण संपले महत्त्व संपले! असे मोगलांचे धोरण असल्याने ही राजकीय मुत्सद्देगिरी! 

पण राजा मानसिंग सारख्या मोगल राजकारणातील बळींची संख्या बरीच आहे, त्यातलेच एक उदाहरण म्हणजे मिर्झाराजा जयसिंग!

असो, राजा मानसिंगाणे राणा प्रताप आणि मिर्झाराजा जयसिंगाने शिवछत्रपतिला प्रसंगी आपली साथ न देता मोगलांचे विराट स्वरूप आणि वर्चस्व दाखवीले..!

नियतीचा खेळ,,, अपूर्ण कसा राहील.!

शिव-राणा जगामध्ये विराजमान झाले मात्र राजा जयसिंग आणि राजा मानसिंग यांच्या समाध्या आपल्या वंशजांना सुद्धा पारख्या झाल्या..!!!!!

-प्रा रवि आत्माराम बाविस्कर

।।फक्तइतिहास।।

Comments

Followers चला माझ्यासोबत इतिहासाच्या वाटेवर..

Popular Posts