Skip to main content

Featured

कनकादित्य सूर्य मंदिर कशेळी

मित्रांनो, दिवाळीच्या सुट्ट्यांमध्ये कोकणच्या निरागस आणि दिव्यभूमीला स्पर्श करण्याचा योग आला. आदित्य म्हणजे सूर्य. तसे सूर्य मंदिर भारताबाहेरही आढळतात. त्यापैकी भारतात ओडिशा राज्यातील कोर्णाकचे सूर्यमंदिर तर जगप्रसिद्ध आहेच. त्याचबरोबर सौराष्ट्रात (गुजरात) वेरावळ बंदराजवळ प्रभासपट्टण येथे फार प्राचीन सूर्यमंदिर आहे. १२९३ मध्ये अल्लाउद्दीन खिलजी सौराष्ट्रावर चाल करून आला. त्या वेळी प्रभासपट्टणच्या सूर्यमंदिरात वेगवेगळ्या आसनांवर बसलेल्या बारा सूर्यमूर्ती होत्या जे बारा महिन्याचे प्रतिक होते. हल्ल्याची आगाऊ बातमी मिळाल्यामुळे तेथील पुजाऱ्याने दक्षिणेकडे जाणाऱ्या वेरावळच्या एका व्यापाऱ्याच्या गलबतावर त्यातील काही मूर्ती चढवल्या व तो व्यापारी त्या मूर्ती घेऊन दक्षिणेकडे निघाला. फक्त येथील परिस्थिती शांत झाल्यावर तू त्या मूर्ती परत आन अशी सूचना पुजारीने त्या व्यापाऱ्याला सांगितले. ते गलबत कशेळी गावाच्या समुद्रकिनाऱ्यापाशी आले असता अडकले, पुढे जाईना भरपूर प्रयत्न केले पण जहाज काय जागचे हलेना शेवटी त्या व्यापाऱ्याच्या मनात आले की, कदाचित देवाची येथेच राहण्याची इच्छा आहे. म्हणून त्याने एक मूर्...

निजामाच्या काही विनोदी कथा-हुक्का आणि कॉफी


पहिला निजाम हा अत्यंत धोरणी आणि कर्तबगार होऊन गेला.
त्याचा चिटणीस मन्साराम याने त्याचे चरित्र लिहिले आहे. या ग्रंथाचे नाव मासिरे निजामी. याशिवाय रिसालाये दरबारे आसफिया हा ग्रंथ त्यांने लिहिला असून या दोन्ही ग्रंथात त्याने निजामाच्या दरबारातील रितीरिवाज यांचे वर्णन केले आहे.
मन्सारामाला अनेक वर्षे निजामाचा सहवास लाभल्यामुळे त्यांने नमूद केलेल्या आठवणी मनोरंजक आहेत. त्यातील एक उदाहरण त्याच्याच शब्दात पहा..
"स्वर्गात कसे होणार.."
निजामाचा बक्षी तहव्वूरखान हा असून निजामाचा त्याच्यावर पूर्ण विश्वास होता. एके दिवशी तो निजामाच्या दरबारातून उठून बाहेर गेला. निजामाचा खिजमतगार मकबूल जवळच उभा होता. निजामाने त्याला हलकेच सांगितले की तहव्वूरखान हा बाहेर जाऊन काय करतो ते पाहून ये. थोड्या वेळाने मकबूल परत आला, त्याने सांगितले "तहव्वूरखान हा बाहेर जाऊन आपल्या घोड्याच्या खोगिरीवरील जाजम जमिनीवर अंथरतो आणि हुक्का ओढीत बसतो." निजाम हा हुक्का ओढीत नसे आणि ते त्याला आवडत नसे. तहव्वूरखान परत आल्यानंतर निजामाने त्याला म्हटले,"तहव्वूरखान बहादुर,तुम्हाला माहीतच आहे की आपल्या धर्मकल्पनेप्रमाणे परलोकात जी काही आग आहे ही सगळी नरकातच आहे. स्वर्गात अग्नी नसतो. मला एका गोष्टीची काळजी वाटते. आपल्यापैकी ज्यांना हुक्का ओढण्याची सवय आहे, त्यांचे स्वर्गात कसे होणार..? तेथे हुक्क्याकरिता त्यांना आग कोठून मिळणार.?"
तहव्वूरखानाने ओळखले की हे सगळे आपल्याला उद्देशून आहे. तो मोठा विनोदी आणि हजरजबाबी होता. निजामाला कॉफी पिण्याची सवय असे. खानाने म्हटले,"सरकार हुक्के ओढणाऱ्यांना काळजी करण्याचे कारण नाही. स्वर्गात आपल्याला कॉफी लागणारच. त्याकरिता कुठून तरी शेगडी येईलच. त्यातीलच काही निखारे घेऊन हुक्केवाले आपली गरज भागवतील!" हे ऐकून निजामाने स्मित केले.
-मन्साराम,निजामाच्या काही आठवणी..
||फक्त इतिहास||


1 / 3
Caption Text
2 / 3
Caption Two
3 / 3
Caption Three

निजाम आणि बाजीरावची एक पोस्ट-
भूमी कठीण आणि आकाश दूर..!

Comments

Followers चला माझ्यासोबत इतिहासाच्या वाटेवर..

Popular Posts