Skip to main content

Featured

कनकादित्य सूर्य मंदिर कशेळी

मित्रांनो, दिवाळीच्या सुट्ट्यांमध्ये कोकणच्या निरागस आणि दिव्यभूमीला स्पर्श करण्याचा योग आला. आदित्य म्हणजे सूर्य. तसे सूर्य मंदिर भारताबाहेरही आढळतात. त्यापैकी भारतात ओडिशा राज्यातील कोर्णाकचे सूर्यमंदिर तर जगप्रसिद्ध आहेच. त्याचबरोबर सौराष्ट्रात (गुजरात) वेरावळ बंदराजवळ प्रभासपट्टण येथे फार प्राचीन सूर्यमंदिर आहे. १२९३ मध्ये अल्लाउद्दीन खिलजी सौराष्ट्रावर चाल करून आला. त्या वेळी प्रभासपट्टणच्या सूर्यमंदिरात वेगवेगळ्या आसनांवर बसलेल्या बारा सूर्यमूर्ती होत्या जे बारा महिन्याचे प्रतिक होते. हल्ल्याची आगाऊ बातमी मिळाल्यामुळे तेथील पुजाऱ्याने दक्षिणेकडे जाणाऱ्या वेरावळच्या एका व्यापाऱ्याच्या गलबतावर त्यातील काही मूर्ती चढवल्या व तो व्यापारी त्या मूर्ती घेऊन दक्षिणेकडे निघाला. फक्त येथील परिस्थिती शांत झाल्यावर तू त्या मूर्ती परत आन अशी सूचना पुजारीने त्या व्यापाऱ्याला सांगितले. ते गलबत कशेळी गावाच्या समुद्रकिनाऱ्यापाशी आले असता अडकले, पुढे जाईना भरपूर प्रयत्न केले पण जहाज काय जागचे हलेना शेवटी त्या व्यापाऱ्याच्या मनात आले की, कदाचित देवाची येथेच राहण्याची इच्छा आहे. म्हणून त्याने एक मूर्...

भूमी कठीण आणि आकाश दूर...


...कोल्हापूरकर संभाजीराजा आणि सुलतानजी निंबाळकर या मराठी शक्ती निजामाला येऊन मिळाल्या!!
आपण आता शाहू महाराज आणि बाजीराव यांचा सहज पाडाव करून मराठ्यांच्या घोड्यांना वेसण घालू या तोर्‍यात निजाम वागू लागला.
सुलतानजीने विस हजारांचे सैन्य उभे करून आपण बाजीरावचा मोड करू असे निजामाला आश्वासन दिले.! आणि निजामाला आता आकाश ठेंगणे वाटू लागले.!!
निजामाच्या हालचाली सुरु झाल्या बरोबर सुरुवातीस शाहूमहाराज गडबडले. कारणही तसे होते, सुलतानजी सारखा असामी आणि संभाजी राजे निजामाला सामील होणे म्हणजे मोठे आव्हान होते!
पण मराठ्यांची शक्ती त्यांच्या संख्येत नव्हती, होती त्यांच्या इराद्यात!
आणि त्यासाठी शिवशंभु नंतर बाजीराव सारखा महायोद्धा जणू नियतीनेच निर्धारित केला होता!
बाजीरावाने नोव्हेंबर १७२७ ते मार्च १७२८ या काळात निजामाशी प्रखर संघर्ष करून त्याला पालखेड येथे कोंडले.!
अखेर निजामाला शाहू महाराजांचा चौथाई सरदेशमुखीचा अधिकार मान्य करून कोल्हापूरकर संभाजीराजाला आपल्या छावणीतून बाहेर पाठवावे लागले.!
आणि मराठी सरदार दावजी सोमवंशी, गोरखोजी भापकर, सत्यसिंग भोसले, फत्तेसिंह भोसले हे चौथाई वसूल करीत निजामाच्या राज्यातून स्वैर संचार करु लागले.!!
पेशवे दप्तर खंड १० पान क्र. ६६ वरील निजामाच्या सल्लागाराचे उद्गार की,
सुलतानजिचा इतका भरवसा नबाब साहेबांना होता जे वीस हजार फौज मिळवून बाजीराव यास मोडेल परंतु काहीच नाही जाहले!

निजाम मात्र आपले अपयश लपवण्यासाठी नेहमीप्रमाणे दिल्लीच्या मोगल बादशाहाला दोष देऊ लागला. मात्र निजामाचा अधिकारी आणि 'हवाले खवाकीं' या निजाम चरित्राचा लेखक मोहम्मद कासिम म्हणतो-

बादशहाचे काय धोरण राहील याबद्दल त्याला खात्री नव्हती. निरुपाय होऊन त्याने तह केला पण या घटनेने त्याला अतिशय वाईट वाटले. शोकातिरेकामुळे त्याने किती दिवस नीट जेवण खावन नाही केले. अनेक वेळा तो आपली मनगटे जाऊन म्हणे-
'अफसोस, अफसोस आमचे गाफील बादशहा माझ्यासारख्या निरपराधी माणसाच्या मागे लागले आहेत, असे ते करणार नाहीत अशी मला थोडीशी जरी खात्री वाटली तर एक वर्षाच्या आत या दृष्ट जमातीला (मराठे) मी दक्षिणेतून काढून लावीन, त्यांचे नावही शिल्लक ठेवणार नाही. पण काय करावे "भूमी कठीण आणि आकाश दूर" अशी स्थिती झाली आहे.!!
- प्रा रवि आत्माराम बाविस्कर
।।फक्तइतिहास।।

Comments

Followers चला माझ्यासोबत इतिहासाच्या वाटेवर..

Popular Posts