Skip to main content

Featured

कनकादित्य सूर्य मंदिर कशेळी

मित्रांनो, दिवाळीच्या सुट्ट्यांमध्ये कोकणच्या निरागस आणि दिव्यभूमीला स्पर्श करण्याचा योग आला. आदित्य म्हणजे सूर्य. तसे सूर्य मंदिर भारताबाहेरही आढळतात. त्यापैकी भारतात ओडिशा राज्यातील कोर्णाकचे सूर्यमंदिर तर जगप्रसिद्ध आहेच. त्याचबरोबर सौराष्ट्रात (गुजरात) वेरावळ बंदराजवळ प्रभासपट्टण येथे फार प्राचीन सूर्यमंदिर आहे. १२९३ मध्ये अल्लाउद्दीन खिलजी सौराष्ट्रावर चाल करून आला. त्या वेळी प्रभासपट्टणच्या सूर्यमंदिरात वेगवेगळ्या आसनांवर बसलेल्या बारा सूर्यमूर्ती होत्या जे बारा महिन्याचे प्रतिक होते. हल्ल्याची आगाऊ बातमी मिळाल्यामुळे तेथील पुजाऱ्याने दक्षिणेकडे जाणाऱ्या वेरावळच्या एका व्यापाऱ्याच्या गलबतावर त्यातील काही मूर्ती चढवल्या व तो व्यापारी त्या मूर्ती घेऊन दक्षिणेकडे निघाला. फक्त येथील परिस्थिती शांत झाल्यावर तू त्या मूर्ती परत आन अशी सूचना पुजारीने त्या व्यापाऱ्याला सांगितले. ते गलबत कशेळी गावाच्या समुद्रकिनाऱ्यापाशी आले असता अडकले, पुढे जाईना भरपूर प्रयत्न केले पण जहाज काय जागचे हलेना शेवटी त्या व्यापाऱ्याच्या मनात आले की, कदाचित देवाची येथेच राहण्याची इच्छा आहे. म्हणून त्याने एक मूर्...

छत्रपतींनी केला सप्तकोटेश्वराचा जिर्णोद्धार


सन १६६८ मध्ये गोव्याच्या आक्रमणात शिवाजीराजांनी बारदेश प्रांतातील भातग्राम नार्वे येथील सप्तकोटेश्वर नावाचे एक जीर्ण मंदिर आढळले. पंचगंगा नदीकाठी असलेले हे मंदिर नार्वे गावी होते. हे देऊळ कोकणमधिल सहा पुरातन मुख्य देवतांपैकी एक मानले जाई. गोव्यामधल्या बाराव्या शतकातील कदंब घराण्याचे हे कुलदैवत होते. त्यांच्या बिरुदात ह्याचा उल्लेख सापडतो -

श्रीसप्तकोटेश्वरलब्धवरप्रसाद श्रीकादंबवीर"

बहमनीच्या काळात तिसवाडीयेथील मूळ देऊळ पाडण्यात आले होते व पुढे कित्येक वर्ष ते तसेच पडून राहिले. त्यातील शिवपिंडी बाहेर काढून शेताच्या बांधाखाली गाडण्यात आली म्हणजे त्यावरून लोक चालत जातील. त्यानंतर विजयनगरच्या काळात बुक्कदेवरायाने ह्या देवळाचा जीर्णोद्धार केला व त्याला गतवैभव प्राप्त झाले. 
इसवीसन १५१० मधे पोर्तुगीजांनी हा प्रांत बळकावला व गोमांतकातील देवळांवर अवकळा आली. सन १६४० मध्ये तिसवाडीचे हे देऊळ पोर्तूगीजांनी नष्ट केले. पुन्हा त्यातील शिवपिंडी काढून विहिरीच्या काठावर बसवली गेली म्हणजे बाटलेले ख्रिस्ती त्यावर पाय ठेऊन विहिरीतील पाणी काढतील. मात्र भतग्रामातील एका देसायाने ती शिवपिंडी विहिरीवरुन काढली व नार्वे गावी नेऊन नवीन देऊळ बांधले. हे कळल्यावर पोर्तुगीजांनी ते देऊळ पाडले नाही पण त्यावर जबर कर बसवला. पण पोर्तूगीज अमलात ते हळूहळु जीर्णावस्थेत पडले.

गोव्याच्या स्वारीवेळी शिवाजीमहाराज जेव्हा वेंगुर्ल्याहुन नारव्यास गेले तेव्हा त्यांना हे मोडकळीस आलेले देऊळ दिसले. त्यांनी हे देऊळ पुन्हा उभारायचे ठरविले व आपल्या लोकांना तसे आदेश दिले. १३ नोव्हेंबर १६६८ रोजी त्याच्या पुनर्बांधणीची तयारी सुरु झाली. देवळाच्या प्रवेशदारावर खालिल शिलालेख कोरवलेला आहे, जो या जीर्णोद्धाराची साक्ष देतो. तो आजही पहावयास मिळतो.
सप्तकोटेश्वराच्या प्रवेशदारावरील शिलालेख- 

श्रीसप्तकोटीश शके १५९० किलकाब्दे कार्तिक कृष्ण पंचम्यां सोमे श्रीशिवराज्ञा देवालयस्य प्रारंभाः ।। 

हा शिलालेख साक्षि आहे जुलूमाचे स्तोम कितीही माजो,अखेर सत्य व मानवधर्म प्रस्थापित होतोच!

शासकाने रयतेवर शासन अवश्य करावे. मात्र त्यासाठी रयतेची देवळे भंगावी लागत नाहीत. कारणे देवळे नव्हेत तर ती त्यांची मनं आहेत व खरं शासन हे रयतेच्या मनावर असावे लागते. व ते मदतीने व निर्मीतीतून साधता येते. 
||फक्तइतिहास||

Comments

Followers चला माझ्यासोबत इतिहासाच्या वाटेवर..

Popular Posts