Skip to main content

Featured

कनकादित्य सूर्य मंदिर कशेळी

मित्रांनो, दिवाळीच्या सुट्ट्यांमध्ये कोकणच्या निरागस आणि दिव्यभूमीला स्पर्श करण्याचा योग आला. आदित्य म्हणजे सूर्य. तसे सूर्य मंदिर भारताबाहेरही आढळतात. त्यापैकी भारतात ओडिशा राज्यातील कोर्णाकचे सूर्यमंदिर तर जगप्रसिद्ध आहेच. त्याचबरोबर सौराष्ट्रात (गुजरात) वेरावळ बंदराजवळ प्रभासपट्टण येथे फार प्राचीन सूर्यमंदिर आहे. १२९३ मध्ये अल्लाउद्दीन खिलजी सौराष्ट्रावर चाल करून आला. त्या वेळी प्रभासपट्टणच्या सूर्यमंदिरात वेगवेगळ्या आसनांवर बसलेल्या बारा सूर्यमूर्ती होत्या जे बारा महिन्याचे प्रतिक होते. हल्ल्याची आगाऊ बातमी मिळाल्यामुळे तेथील पुजाऱ्याने दक्षिणेकडे जाणाऱ्या वेरावळच्या एका व्यापाऱ्याच्या गलबतावर त्यातील काही मूर्ती चढवल्या व तो व्यापारी त्या मूर्ती घेऊन दक्षिणेकडे निघाला. फक्त येथील परिस्थिती शांत झाल्यावर तू त्या मूर्ती परत आन अशी सूचना पुजारीने त्या व्यापाऱ्याला सांगितले. ते गलबत कशेळी गावाच्या समुद्रकिनाऱ्यापाशी आले असता अडकले, पुढे जाईना भरपूर प्रयत्न केले पण जहाज काय जागचे हलेना शेवटी त्या व्यापाऱ्याच्या मनात आले की, कदाचित देवाची येथेच राहण्याची इच्छा आहे. म्हणून त्याने एक मूर्...

आग्र्याच्या दरबारात शिव-शंभू...


गुलामिच्या साम्राज्यात स्वाभिमानाचे स्थान घट्ट करणाऱ्या या घटणेला कुवर रामसिंगाचा सरदार परकालदास याचा दिवान कल्याणदास साक्षिदार होता. बिकानेरच्या दफ्तरखान्यात त्याची पत्रे उपलब्ध आहेत.

पदोपदी झालेल्या मानहानीने महाराजांच्या मनात राग धुमसत होता. आणि आता दरबारातील या वागणूकीनेतर त्यांचा प्रक्षोभ झाला. रागात ते रामसिंगावर बरसले-
"तुम देख्यौ, तुम्हारा बाप देख्यौ, तुम्हारा पातशाही देख्यौ. मै ऐसा आदमी हों यू मुझे जसवंतसिंगसो तले गौर करने खड़ा रख्यौ. मै तुम्हारा मनसीब छोड्या. मुझे खडा तो करीनासर रख्या होता.."
रामसिंग त्यांना शांत करण्याचा प्रयत्न करीत होता..
महाराज गरजले-
"म्हारो मरण आयो. यो तो तुम मुझे मारौगे या मै अपघात कर मरोंगा. मेरा सर काटकर ले जावो. मै पादशाके हुजूर नही चालता.."
या गोंधळाची बातमी आतापर्यंत बादशहास लागली होती. त्याने मुल्तफितखान, आकिलखान(दिवाने खासचा व्यवस्थापक)  व मुखलिसखान यांना सांगून पाठविले की, शिवाजीचे समाधान करा, खिल्लत द्या "
मात्र महाराजांनी ती खिल्लत स्वीकारलीच नाही ..
" मै पादशहाकी मनसब नही करता. चाकर नही रहता. मुझे माऱ्यो चाहे मारो. कैदमे किया चाहे कैद करो. मै सरोपाव न पहरो.."

आणि त्यांचे ते रॊद्ररूप तेथे खालमानेनं उभ्या असलेल्या हिंदुस्थानच्या तमाम राजांनी पाहिलं. आनंद ओसरला अन् दरबार सुन्न पडला. आणि  महाराज तेजस्वी सिंहासारखे ताठमानेने दरबारातून निघून गेले. रामसिंग सोबत होता. महाराजांनी बादशहाची पुनश्च कधीच भेट घेतली नाही.
मात्र या भेटीची दखल खुद्द नियतीनेच घेतली. राजकारणवश कधी शत्रूच्या चाकरीत जावेच लागले तरी ती लाचार होऊन न करावी. आणि कुठल्याही परिस्थितीत आपला स्वाभिमान चाकरीखाली जाऊ नये. असेच मर्म या घटनेचे बाल शंभूराजांच्या काळजावर उमटले ते कायमचं. ‌हाच तो अंगार जो पुढे पुनश्च उफाळून आला, गुलामिच्या दरबारातून- रॊद्रशंभू बनून!
........ शौर्यशंभू " पॄ. ५१

||फक्तइतिहास||
http://www.faktitihas.blogspot.in

Comments

Followers चला माझ्यासोबत इतिहासाच्या वाटेवर..

Popular Posts