Skip to main content

Featured

कनकादित्य सूर्य मंदिर कशेळी

मित्रांनो, दिवाळीच्या सुट्ट्यांमध्ये कोकणच्या निरागस आणि दिव्यभूमीला स्पर्श करण्याचा योग आला. आदित्य म्हणजे सूर्य. तसे सूर्य मंदिर भारताबाहेरही आढळतात. त्यापैकी भारतात ओडिशा राज्यातील कोर्णाकचे सूर्यमंदिर तर जगप्रसिद्ध आहेच. त्याचबरोबर सौराष्ट्रात (गुजरात) वेरावळ बंदराजवळ प्रभासपट्टण येथे फार प्राचीन सूर्यमंदिर आहे. १२९३ मध्ये अल्लाउद्दीन खिलजी सौराष्ट्रावर चाल करून आला. त्या वेळी प्रभासपट्टणच्या सूर्यमंदिरात वेगवेगळ्या आसनांवर बसलेल्या बारा सूर्यमूर्ती होत्या जे बारा महिन्याचे प्रतिक होते. हल्ल्याची आगाऊ बातमी मिळाल्यामुळे तेथील पुजाऱ्याने दक्षिणेकडे जाणाऱ्या वेरावळच्या एका व्यापाऱ्याच्या गलबतावर त्यातील काही मूर्ती चढवल्या व तो व्यापारी त्या मूर्ती घेऊन दक्षिणेकडे निघाला. फक्त येथील परिस्थिती शांत झाल्यावर तू त्या मूर्ती परत आन अशी सूचना पुजारीने त्या व्यापाऱ्याला सांगितले. ते गलबत कशेळी गावाच्या समुद्रकिनाऱ्यापाशी आले असता अडकले, पुढे जाईना भरपूर प्रयत्न केले पण जहाज काय जागचे हलेना शेवटी त्या व्यापाऱ्याच्या मनात आले की, कदाचित देवाची येथेच राहण्याची इच्छा आहे. म्हणून त्याने एक मूर्...

पारगड- चंद्र सुर्य असेतो, गड जागता ठेवा’


       पारगड हा महाराष्ट्र व गोव्याच्या सीमेवर वसलेला नितांत सुंदर किल्ला आहे. गडाचे क्षेत्रफळ अंदाजे ४८ चौरस एकर आहे. गडाला पूर्व, पश्चिम व उत्तरेला नैसर्गिक ताशीव कडयाची तटबंदी आहे. दक्षिणेला थोडया उतारानंतर खोल दरी आहे.
सन १६७६ मध्ये पोर्तुगीजांवरील स्वारीवरुन परत येताना शिवरायांनी या डोंगराचे भौगोलिक स्थान व महत्व ओळखले आणि पोर्तुगीज, अदिलशहा व सावंतवाडीचे खेम सावंत यांच्यावर कायमची जरब बसविण्यासाठी हा किल्ला वसविला. शिवाजी महाराजांच्या उपस्थितीत किल्ल्याची वास्तुशांती व गडप्रवेश झाला. या मोक्याच्या किल्ल्यावर राजांनी तानाजी मालुसरेंचा पुत्र ,रायबा मालुसरे याला किल्लेदार म्हणून नेमले. गडाच्या वास्तुशांती व गडप्रवेश यासाठी महाराजांचा या गडावर निवास होता.
त्यावेळी किल्लेदार रायबा मालुसरे व त्यांच्या ५०० सहकार्‍यांना राजांनी आज्ञा केली की,
‘चंद्र सुर्य असेतो, गड जागता ठेवा’.
राजांच्या या आज्ञेचे पालन या गडावरील मावळर्‍यांनी अद्याप पर्यंत केले आहे. स्वराज्यातील पार टोकाचा किल्ला म्हणून याचे नाव "पारगड" ठेवण्यात आले होते.

१६८९ मध्ये शहजादा मुअज्जम व खवासखान यांनी गड जिंकण्याचा अयशस्वी प्रयत्न केला. शेजारील बेळगावसारखे दुर्ग मोगली शक्तीपुढे मान तुकवीत असताना मात्र पारगड अभेद्य राहिला. मात्र त्या लढाईत तोफखान्याचे प्रमुख विठोजी माळवे ‍यांना वीर मरण आले. आज त्यांची समाधी गडावर आहे. नंतरच्या काळात पारगड करवीरकर छत्रपतींच्या ताब्यात गेला. गडावर उत्पन्नाचे साधन नसल्यामुळे ब्रिटीशांनी सुरु केलेला तनखा, गडावरील मावळर्‍यांच्या कुटुंब प्रमुखाला १९४९ सालापर्यंत मिळत होता. परंतु भारत सरकारने तो खंडीत केला व तेव्हापासून सर्व गडकरी गडावर कोणतेही उत्पन्नाचे नसल्यामुळे अत्यंत प्रतिकुल परिस्थितीतही गडावर स्वाभिमानाने दिवस काढत आहेत.
सन २००२ मध्ये विद्यमान गडकर्र्‍यांनी सरकार दरबारी केलेल्या अथक प्रयत्नाने गडावर जाण्यासाठी थेट डांबरी रस्ता तयार करण्यात आला आहे. या रस्त्याने गडाचा उत्तरेकडील कडा डावीकडे ठेवून पुढे गेल्यावर डाव्या हाताला गडाचा शिवकालीन पायर्‍याचा राजमार्ग लागतो. सरळ जाणारी सडक घोड वाटेने सर्जा दरवाजा मार्गे गडावर जाते व उजवीकडून गोव्याला जाते. शिवकालीन ३६० पायर्‍या चढून गेल्यावर सपाटीवर तोफांचे अवशेष व डौलाने फडकणारा भगवा ध्वज आपले स्वागत करतो.
गडावर प्रवेश करताच ३ तोफा आपले स्वागत करतात. डाव्या हातास मारुतीचे मंदिर आहे. मंदिरा समोरच घडीव दगडातील समाधी आहे. पुढे गेल्यावर पारगडवासिर्‍यांची वस्ती सुरु होते. पायवाटेने पुढे गेल्यावर शाळा व त्यासमोर गडाची सदर आहे. या सदरेवरच शिवरार्‍यांचा पूर्णाकृती पुतळा आहे. पुढे गेल्यावर उजव्या हातास गडकर्‍र्‍यांनी अत्यंत जिद्‌दीने जिर्णोध्दार केलेले भवानी मातेचे भव्य मंदिर लागते. या मंदिराच्या गाभार्‍यात शिवकालीन मूळ दगडी मंदिर आहे. या मंदिरातील भवानी मातेची मूर्ती नेपाळच्या गंडकी शिळेपासून तयार केली असून, ती प्रतापगडावरील भवानी मातेची आठवण करुन देते. भवानी मंदिरापलिकडे प्राचिन गणेश मंदिर आहे. गडाच्या तट फेरीस सुरवात केल्यावर आपणांस गुणजल, महादेव, फाटक व गणेश तलाव लागतात. गडावर शिवकालीन १७ विहिरी आहेत, पैकी ४ चांगल्या अवस्थेत आहेत बाकी बुजलेल्या अवस्थेत आहेत. तटाच्या पश्चिमोत्तर फेरफटक्यात आपणास भालेकर, फडणीस व महादेव असे ३ डौलदार बुरुज दिसतात. याशिवाय माळवे, भांडे, झेंडे बुरुज अशी नावे असलेले आणखी बुरुजही गडास आहेत. गडाच्या उत्तरेकडील बाजूस दरीच्या काठावर महादेव मंदिर आहे. मुलांच्या खेळण्याच्या पटांगणा पलिकडे तुळसाबाई माळवे र्‍यांची १६८० मधील समाधी आहे, तर गडाखालील मिरवेल या गावात घोडदळ पथकाचे प्रमुख खंडोजी झेंडे यांच्या पत्नी म्हाळसाबाई यांचे स्मारक आहे.

पारगडावर नरवीर तानाजी मालुसरे यांचे ११ वे वंशज बाळकृष्ण मालुसरे, शेलार मामांचे वंशज कोंडाजी शेलार, शिवकाळातील तोफखान्याचे प्रमुख विठोजी माळवे यांचे वंशज, कान्होबा माळवे इत्यादी वास्तव्यास आहेत. बाळकृष्ण मालुसरे व्यावसायानिमित्त अनगोळ, बेळगावला असतात. त्र्‍यांचेकडे तानाजींची तलवार व शिवरार्‍यांच्या गळयातील सामुद्री कवडर्‍यांची माळ जतन केलेली आहे. अशा फक्त ५ माळा महाराष्ट्रात उपलब्ध असून, त्या सातारच्या राजवाडयात, प्रतापगडावरील भवानीच्या गळयात, कोल्हापूर महालक्ष्मीच्या गळयात व तुळजापूरच्या भवानीच्या गळयात आहेत असे बोलले जाते. माघ महिन्यातील उत्सवात व दसर्‍याच्या उत्सवात गडावरील मावळे आपल्या पूर्वजांची शस्त्रास्त्रे प्रदर्शित करतात.

संदर्भ- मइसा खं १२
||फक्तइतिहास||

Comments

Followers चला माझ्यासोबत इतिहासाच्या वाटेवर..

Popular Posts