Skip to main content

Featured

नागझरी आणि दरेगाव येथील वास्तुशिल्पांची अनुभूती..

  मित्रांनो, या भारत भूमीवर प्राचीन सुंदर कलाकृती जगप्रसिद्ध आहेत, मात्र सामान्य दर्जाची, कमी कलाकृतीची दुर्लक्षित असलेली अनेक ऐतिहासिक ठिकाणे आजही खेड्याबाऱ्मध्ये बरीच आहेत. अशा दुर्लक्षित इतिहास पुरुषांचा शोध मनाला नेहमीच असतो. आज बुलडाणा जिल्ह्यात फिरत असताना नेहमीप्रमाणे शोध घेतल्यावर समजले की शेंदुर्जनाच्या जवळ दोन ऐतिहासिक ठिकाणं आहेत. मग काय, आम्हाला इतिहासात टाईम ट्रॅव्हल करण्याची संधी चालून आली.! मित्रांनो,  शेंदुर्जन(सिंदखेड तालुका) येथून उजवीकडे वळून आम्ही साधारणपणे दोन किलोमीटर अंतरावर नागझरी फाट्यावरून डावीकडे वळलो. एक किलोमीटर अंतरावर नागझरी हा छोटा गाव लागला. या गावाच्या पिछाडीवर अतिशय खडतर रस्त्याने खाली उतरत एक किलोमीटर मोटर सायकलने गेल्यावर आम्ही डोंगराच्या कुशीत एका रमणीय ठिकाणास पोचलो. येथे एक प्राचीन महादेवाचे देवालय असून त्यासमोर धार कुंड आहे. देवालय बाह्य दर्शनी पाहिल्यास सुंदर कलाकृतीचे असून लहान लहान विटांनी बांधलेले दिसते. देवालयाचा जीर्णोद्धार झाला असल्याने मूळ स्वरूप नष्ट झाले आहे. असो, देवालयात प्रवेश केल्यावर हेमाडपंथी बांधणीचे सहा दगडी स्तंभ दिसत...

"राजेश्री साहेबांचे शासन "





सन १६८१ मध्ये स्वराज्यात बादशहा आपल्या लक्ष फौजेसह दाखल झाला होता. स्वराज्यातील सरदार-वतनदारांना मनसबीचे अमीष देऊन तो आपल्याकडे खेचत होता. असेच बादशहाच्या अमीषाला अक्टोबर १६८५ मध्ये पून्याजवळील कारी चे सर्जेराव जेधे हा बळी पडला. याचा बाप कान्होजी जेधे हा शिवाजीमहाराजांचा एकनिष्ठ वतनदार होता. अफजलखान चालून आला त्यावेळी त्याने महाराजांची साथ सोडली नव्हती. पण त्याचा मुलगा सर्जेराव मोगलांस फितूर झाला. पण लवकरच पुणे भागात मोगलांचा पराभव झाल्याने तो पून्हा आपल्या वतनासाठी राजांचा काैल मागू लागला. त्यावर संभाजीराजांनी त्यास एक खरमरीत कानउघडणी करणारे आज्ञापत्र पाठविले. ते असे-

'....तरी तुम्ही आपला मुद्दा स्वामिचे सेवेसी लिहीला. त्यावरून हे आज्ञापत्र तुम्हास लिहिले. तरी आधी तुम्हीच सरासरी हरामखोरी केली की, वतनदार होऊन इमाने इतबारे वर्तावे ते गोष्ट न करीता स्वामिचे अन्न बहुत दिवस भक्षिलें. त्याचे सार्थक केलेत की स्वामिंच्या पायाशी दुर्बुद्धी धरून दोन दिवसांचे मोगल त्यांकडे जाऊन राहिलेस....याउपरीही गनिमाकडे राहणेच असेल तरी सुखे राहणे. तुमचा किसाब तो काय? ए क्षणी स्वामि आज्ञा करीतात तरी गनिम देखिल तुम्हास कापुन काढील हे बरे समजणे. हुजूराती खेरीज दुसरीकडे राबीता न करणे. जे वर्तमान लिहीणे ते स्वामिस लिहीत जाणे. तुमचे ठाई एकनिष्ठताच आहे ऐसे स्वामिस कळलियावरी जे आज्ञा करणे ते करून आज्ञापत्र सादर होईल. तेणेप्रमाणे वर्तणुक करणे...'

अर्थ-आमचे राज्यात जगला, वतन चालवले आणि आता दोन दिवसांच्या मोगलांना जाऊन मिळाले,सरासरी हरामखोरी केली. तुमची हस्ती ती काय? यावेळी आम्ही मनात आणलेच तर गनिमसुद्धा तुम्हाला कापून काढेल...
-संदर्भ: संभाजी कालीन पत्रसारसंग्रह

प्रस्तुत पत्रातून एका तेजस्वी आणि करारी शासकाची प्रतीमा बघावयास मिळते. स्वराज्यात पाच लाख मोगल उतरले तरी राजांचा निर्धार मोठा होता. तेथे निराशेचा लवलेशही नव्हता खासच.!
|| फक्त इतिहास||

Comments

Followers चला माझ्यासोबत इतिहासाच्या वाटेवर..

Popular Posts