Skip to main content

Featured

कनकादित्य सूर्य मंदिर कशेळी

मित्रांनो, दिवाळीच्या सुट्ट्यांमध्ये कोकणच्या निरागस आणि दिव्यभूमीला स्पर्श करण्याचा योग आला. आदित्य म्हणजे सूर्य. तसे सूर्य मंदिर भारताबाहेरही आढळतात. त्यापैकी भारतात ओडिशा राज्यातील कोर्णाकचे सूर्यमंदिर तर जगप्रसिद्ध आहेच. त्याचबरोबर सौराष्ट्रात (गुजरात) वेरावळ बंदराजवळ प्रभासपट्टण येथे फार प्राचीन सूर्यमंदिर आहे. १२९३ मध्ये अल्लाउद्दीन खिलजी सौराष्ट्रावर चाल करून आला. त्या वेळी प्रभासपट्टणच्या सूर्यमंदिरात वेगवेगळ्या आसनांवर बसलेल्या बारा सूर्यमूर्ती होत्या जे बारा महिन्याचे प्रतिक होते. हल्ल्याची आगाऊ बातमी मिळाल्यामुळे तेथील पुजाऱ्याने दक्षिणेकडे जाणाऱ्या वेरावळच्या एका व्यापाऱ्याच्या गलबतावर त्यातील काही मूर्ती चढवल्या व तो व्यापारी त्या मूर्ती घेऊन दक्षिणेकडे निघाला. फक्त येथील परिस्थिती शांत झाल्यावर तू त्या मूर्ती परत आन अशी सूचना पुजारीने त्या व्यापाऱ्याला सांगितले. ते गलबत कशेळी गावाच्या समुद्रकिनाऱ्यापाशी आले असता अडकले, पुढे जाईना भरपूर प्रयत्न केले पण जहाज काय जागचे हलेना शेवटी त्या व्यापाऱ्याच्या मनात आले की, कदाचित देवाची येथेच राहण्याची इच्छा आहे. म्हणून त्याने एक मूर्...

मार्मिक भाष्यकार भिमसेन सक्सेना...


औरंगजेब बादशहाच्या अनेक चरित्र लेखकांपैकी भिमसेन सक्सेना हा एक फारसीत लिहणारा राजस्थानी लेखक होता.
शिवाजी महाराजांच्या साल्हेर विजयाचा, आग्र्याला जातांना औरंगाबादेस सपशिकनखानाशी झालेल्या भेटीचा, महाराजांनी मोगलांविरोधात कुतूबशाही व आदिलशाहीशी केलेल्या 'दख्खन युतीचा' तो साक्षिदार.
संभाजीराजांच्या बलिदानानंतर संताजी, धनाजी, नेमाजी यांच्या झंझावाती मोहिमा, जिंजीचा वेढा आणि मोगलांची किल्ले घेण्यासाठीची चाललेली धावपळ तो बघत होता.
आपल्या 'तारिके दिल्कुशा' या ऐतिहासिक फारसी ग्रंथात मोगल-मराठ्यांच्या युद्धाचा इतिहास लिहतांना तो बादशहावरही मार्मीक भाष्य करून जातो. तसे तो दतियाचा राजा राव दल्पत याच्या नोकरीत होता. राव दल्पतने त्याला दतियाकडे काही जहागिरी दिल्या होत्या. मात्र युद्धाच्या धामधुमीमुळे सन १७०० च्या सुमारास तो आर्थीक हालाखित होता. ऐके ठिकाणी तो लिहतो-
माझे उत्पन्न येईनाशे झाले. माझी दशा वरवर पा हता खालावली होती; पण मी ते मनाला लावून घेतले नाही. मला पूर्वीही पैशाचा लोभ नव्हता आणि आताही नाही. माणसे पैशाकडे पाहात नाहीत, नावलौकीकाची चाड ठेवतात. जो कीर्ती आणि नाव कमावण्याची ईच्छा धरतो तो खरा मर्द होय. माझ्या अनुभवावरून मला दिसून आले, की साधन सामग्री नसतानाही हिंमतीने वागणे हेच भूषणावह आहे.
फारसी कवीता-
हिंमत बलंद दार के निन्दे खुदा व खल्क
बाशद बकद्रे हिंमते तू एतिबारे तू"

माणसे अतिशय लोभी असतात हे माझ्या पाहाण्यात आले. आता आलमगीर बादशहाच पाहा. त्याला जगात काय कमी आहे बरे ! पण किल्ले जिंकून घेण्याचा काय विलक्षण लोभ त्याला आहे. दगडधोंड्यांच्या ढिगाऱ्यासाठी (किल्ल्यांसाठी) तो पाहा कसा रानोमाळ भटकत आहे. ही जर त्याची स्थिती तर जगात बहुसंख्य असलेल्या कमीबुद्धिच्या लोकांची कथा काय ?
|| फक्तइतिहास ||
http://www.faktitihas.blogspot.in

Comments

Followers चला माझ्यासोबत इतिहासाच्या वाटेवर..

Popular Posts