Skip to main content

Featured

नागझरी आणि दरेगाव येथील वास्तुशिल्पांची अनुभूती..

  मित्रांनो, या भारत भूमीवर प्राचीन सुंदर कलाकृती जगप्रसिद्ध आहेत, मात्र सामान्य दर्जाची, कमी कलाकृतीची दुर्लक्षित असलेली अनेक ऐतिहासिक ठिकाणे आजही खेड्याबाऱ्मध्ये बरीच आहेत. अशा दुर्लक्षित इतिहास पुरुषांचा शोध मनाला नेहमीच असतो. आज बुलडाणा जिल्ह्यात फिरत असताना नेहमीप्रमाणे शोध घेतल्यावर समजले की शेंदुर्जनाच्या जवळ दोन ऐतिहासिक ठिकाणं आहेत. मग काय, आम्हाला इतिहासात टाईम ट्रॅव्हल करण्याची संधी चालून आली.! मित्रांनो,  शेंदुर्जन(सिंदखेड तालुका) येथून उजवीकडे वळून आम्ही साधारणपणे दोन किलोमीटर अंतरावर नागझरी फाट्यावरून डावीकडे वळलो. एक किलोमीटर अंतरावर नागझरी हा छोटा गाव लागला. या गावाच्या पिछाडीवर अतिशय खडतर रस्त्याने खाली उतरत एक किलोमीटर मोटर सायकलने गेल्यावर आम्ही डोंगराच्या कुशीत एका रमणीय ठिकाणास पोचलो. येथे एक प्राचीन महादेवाचे देवालय असून त्यासमोर धार कुंड आहे. देवालय बाह्य दर्शनी पाहिल्यास सुंदर कलाकृतीचे असून लहान लहान विटांनी बांधलेले दिसते. देवालयाचा जीर्णोद्धार झाला असल्याने मूळ स्वरूप नष्ट झाले आहे. असो, देवालयात प्रवेश केल्यावर हेमाडपंथी बांधणीचे सहा दगडी स्तंभ दिसत...

शिवाजी महाराजांचे मोगलांस उत्तर"


मित्रहो, लंडनच्या राॅयल एशियाटिक सोसायटीच्या ग्रंथात एक फारसी हस्तलिखित आहे. या ग्रंथाचे नाव " खुतूते शिवाजी " म्हणजे शिवाजीची पत्रे असे आहे. या हस्तलिखिताची आणखी एक प्रत कलकत्ता येथील एशियाटिक सोसायटीत आहे.  सर जदुनाथ सरकार यांनी त्याची प्रत तयार करून आपल्या संग्रही ठेवली. तीची फोटो प्रत मुंबईच्या सरकारी दप्तरखान्यात आहे. यात 32 पत्रे आहेत. त्यातील एक पत्र शाईस्ताखानाची बोटे छाटल्यानंतर महाराजांनी औरंगजेब बादशहाच्या अधिकार्‍याला लिहलेले येथे सादर करीत आहे.

दूरदृष्टीच्या विचारवंतांना ही गोष्ट माहीत असावी की , गेली तीन वर्षात बादशहाचे प्रसिद्ध सेनापती या भागात येत आहेत. माझा मुलूख व किल्ले जिंकून घ्यावेत अशी बादशहांने त्यांना आज्ञा केली. अपार कष्ट रूपी घोड़ेदेखिल माझ्या या मुलूखात फिरू शकत नाहीत...
अदिलशहाकडून अफजलखान प्रचंड सैन्यानिशी आला. तो असमर्थ बनून नाश पावला. ही वस्तूस्थिती तुम्ही बादशहाला का कळविली नाही..? यामुळे तुमचा नाश टळेल.

अफजल नंतर अमीरूल शाईस्ताखान हा माझ्या उंच पर्वतांनी व खोल दर्यांनी युक्त अशा प्रदेशावर चालून आला. तीन वर्षे त्याने पराकाष्ठा केली. मी शिवाजीचा मुलूख जिंकून घेईन, असे त्याने बादशहाला कळविले. अशा खोट्या वृत्तीचा व्हायचा तोच परिणाम झाला. फजिती होऊन त्याला निघून जावे लागले. ही गोष्ट सूर्यप्रकाशाईतकी स्पष्ट आहे.

माझ्या देशाचे रक्षण करणे हे माझे कर्तव्य होय.स्वत:ची प्रतिष्ठा कायम राखण्याकरीता तुम्ही बादशहाला खोटे लिहून पाठवता. पण माझ्यावर परमेश्वराची कृपा आहे. या देशावर आक्रमण करण्याच्या उद्देशाने येणारा कोणीही असो. त्याची ईच्छा फलद्रुप झाली नाही....

रक्ताच्या या नदीची भिती सर्व शहाण्यांना वाटते , कारण यातून आपली नाव सुरक्षित नेणे कुणालाच जमले नाही...... ! "

असे हे पत्र बादशहाच्या सेनापतींची परखडपणे कानउघडणी करणारे असून महाराजांचा स्वाभिमान व आत्मविश्वास व्यक्त करणारे असे आहे.
संदर्भ- खुतूते शिवाजी

||फक्तइतिहास||

Comments

Followers चला माझ्यासोबत इतिहासाच्या वाटेवर..

Popular Posts