Skip to main content

Featured

कनकादित्य सूर्य मंदिर कशेळी

मित्रांनो, दिवाळीच्या सुट्ट्यांमध्ये कोकणच्या निरागस आणि दिव्यभूमीला स्पर्श करण्याचा योग आला. आदित्य म्हणजे सूर्य. तसे सूर्य मंदिर भारताबाहेरही आढळतात. त्यापैकी भारतात ओडिशा राज्यातील कोर्णाकचे सूर्यमंदिर तर जगप्रसिद्ध आहेच. त्याचबरोबर सौराष्ट्रात (गुजरात) वेरावळ बंदराजवळ प्रभासपट्टण येथे फार प्राचीन सूर्यमंदिर आहे. १२९३ मध्ये अल्लाउद्दीन खिलजी सौराष्ट्रावर चाल करून आला. त्या वेळी प्रभासपट्टणच्या सूर्यमंदिरात वेगवेगळ्या आसनांवर बसलेल्या बारा सूर्यमूर्ती होत्या जे बारा महिन्याचे प्रतिक होते. हल्ल्याची आगाऊ बातमी मिळाल्यामुळे तेथील पुजाऱ्याने दक्षिणेकडे जाणाऱ्या वेरावळच्या एका व्यापाऱ्याच्या गलबतावर त्यातील काही मूर्ती चढवल्या व तो व्यापारी त्या मूर्ती घेऊन दक्षिणेकडे निघाला. फक्त येथील परिस्थिती शांत झाल्यावर तू त्या मूर्ती परत आन अशी सूचना पुजारीने त्या व्यापाऱ्याला सांगितले. ते गलबत कशेळी गावाच्या समुद्रकिनाऱ्यापाशी आले असता अडकले, पुढे जाईना भरपूर प्रयत्न केले पण जहाज काय जागचे हलेना शेवटी त्या व्यापाऱ्याच्या मनात आले की, कदाचित देवाची येथेच राहण्याची इच्छा आहे. म्हणून त्याने एक मूर्...

शंभूराजेकालिन हनुमंताचे देवालय व रामनवमी उत्सव


छत्रपति शंभुराजे संत-सज्जनांचा व धर्म संस्कृतीचा नितांत आदर करीत.
समर्थांच्या निर्वाणानंतर त्यांच्या चितास्थानी हनुमंताचे देवालय बांधण्याचा आदेश शंभूराजांनी आपल्या अधिकाऱ्यास दिला होता.
त्यासाठी त्यांनी कर्णाटकातून मूर्ती बोलाविली होती.
देवालयासाठी, नित्यपूजेसाठी व समर्थ शिष्यांसाठी राजांनी खर्चाची मोईन मुक्रर केली.  दिवाकर गोसावी यांच्या विद्यमाने हा खर्च करीत जावा असा आदेश त्यांनी जावळीचा देशाधिकारी कासी रंगनाथ यास १३ मार्च १६८२ रोजी दिला.
श्री समर्थ स्थापित चाफळ येथील श्रीराममूर्ती

तसेच रामनवमीचा उत्सव चाफळ किंवा सज्जनगडी व्हावा याविषयी दिवाकर गोसावी व उद्धव गोसावी यांच्यात एकमत होत नव्हते. मात्र राजांनी रामनवमीचा उत्सव समर्थांनी ठरविल्याप्रमाणे नित्यनियमाने चाफळ येथेच होईल असा निर्वाळा दिला. तसे सज्जनगडाच्या जिजोजी काटकर या हवालदारास व दिवाकर गोसावी यांना कळविले.
ते पत्र -
शंभु छत्रपती- वेदमुर्ती दिवाकर गोसावी
श्रीस्वामि सज्जनगडी पूर्णावतार केला. ते स्थली हनुमंताचे देवालय करवीले आहे...सुबासुबाहून धर्मादाये ईनाम देविला तो आणऊन देवास व समुदायास पाववीत जाणे. श्रीरघुनाथ देवालय चाफळी आहे, तेथिल नित्यपूजा व रथोत्सव सनदेप्रमाणे येथासांग करीत जाणे.

श्री समर्थ समाधी सज्जनगड


संदर्भ- संभाजीराजे पत्र क्र. ६७
||फक्तइतिहास||

Comments

Followers चला माझ्यासोबत इतिहासाच्या वाटेवर..

Popular Posts