Skip to main content

Featured

कनकादित्य सूर्य मंदिर कशेळी

मित्रांनो, दिवाळीच्या सुट्ट्यांमध्ये कोकणच्या निरागस आणि दिव्यभूमीला स्पर्श करण्याचा योग आला. आदित्य म्हणजे सूर्य. तसे सूर्य मंदिर भारताबाहेरही आढळतात. त्यापैकी भारतात ओडिशा राज्यातील कोर्णाकचे सूर्यमंदिर तर जगप्रसिद्ध आहेच. त्याचबरोबर सौराष्ट्रात (गुजरात) वेरावळ बंदराजवळ प्रभासपट्टण येथे फार प्राचीन सूर्यमंदिर आहे. १२९३ मध्ये अल्लाउद्दीन खिलजी सौराष्ट्रावर चाल करून आला. त्या वेळी प्रभासपट्टणच्या सूर्यमंदिरात वेगवेगळ्या आसनांवर बसलेल्या बारा सूर्यमूर्ती होत्या जे बारा महिन्याचे प्रतिक होते. हल्ल्याची आगाऊ बातमी मिळाल्यामुळे तेथील पुजाऱ्याने दक्षिणेकडे जाणाऱ्या वेरावळच्या एका व्यापाऱ्याच्या गलबतावर त्यातील काही मूर्ती चढवल्या व तो व्यापारी त्या मूर्ती घेऊन दक्षिणेकडे निघाला. फक्त येथील परिस्थिती शांत झाल्यावर तू त्या मूर्ती परत आन अशी सूचना पुजारीने त्या व्यापाऱ्याला सांगितले. ते गलबत कशेळी गावाच्या समुद्रकिनाऱ्यापाशी आले असता अडकले, पुढे जाईना भरपूर प्रयत्न केले पण जहाज काय जागचे हलेना शेवटी त्या व्यापाऱ्याच्या मनात आले की, कदाचित देवाची येथेच राहण्याची इच्छा आहे. म्हणून त्याने एक मूर्...

दिवाळीत मुलांनी बांधावे किल्ले...

 



दिवाळीत किल्ले बनवतात हे सर्वांना ठाऊक आहे पण त्याचा एखादा संदर्भ शिवकालात मिळतो का, तर होय. खुद्द शिवछत्रपती बालपणी युद्धावर जाणे, लढाईचा खेळ खेळणे आणि किल्ले बनवणे असे खेळ खेळत असल्याचा उल्लेख शिवभारतकार कवी परमानंद हे आपल्या ग्रंथाच्या सातव्या अध्यायात करतात.

ते म्हणतात-


स एष किल कुर्वाणः शिशुश्शार्दुळ शाब्दितम् । पार्श्ववर्ती स्नेहपात्रीमपिधात्रीमभीषयत् ॥२३॥

अभ्रांतोपिभ्रमरवद् भ्रमिं भ्रांतः कदाचन । हृष्टो हय इवहेषामहलेषत कदाचन ॥२४॥

उच्चैरुदचरेद्दन्ति बृंहितानि कदाचन ॥२५॥

पूरयद्भिर्धरांद्यां च गभीरमधुरस्वरैः । सोभिमानपरोभेरीमन्वकार्षीत् कदाचन ॥२६॥

मृतकूटान्यपि तुंगानि कारयन् स किशोरकैः । इमानि ममदुर्गाणीत्यवोचत कदाचन ॥२७॥


अर्थात- तो (बाल शिवबाराजे) जवळ उभा राहून एकदम वाघासारखी गर्जना करून आपल्या प्रेमळ दाईस सुद्धां भेवडावीत असे. तो भ्रमरहित असूनहि कधीं भ्रमराप्रमाणे गरगर फिरत असे; हर्षभरित होत्साता कधीं घोड्याप्रमाणें खिंकाळत असे. कधी हत्तीप्रमाणे मोठ्याने चीत्कार करी; आपल्या गंभीर आणि मधूर स्वराने आकाश आणि पृथ्वी दुमदुमवून सोडीत तो कधी ऐटीनें दुंदुभीसारखा

आवाज करी. कधी मुलांकडून मातीची उंच शिखरे च करवून 'हे माझे गड' असे म्हणे.


..असे हे शिवबा राजांचे खेळणे ज्यांनी पुढे हिंदवी साम्राज्याची मुहूर्तमेढ रोवली आणि आपल्या दैदिप्यमान पराक्रमाने आणि अजोड दुर्ग बांधणीच्या कौशल्याने सकल पृथ्वीस अचंबित करून सोडले.- शिवभारत

.. दिवाळीच्या सुमारास कोकणमध्ये फिरला असाल तर घरोघरी वा बागेत मुलांनी बनवलेले सुंदर मातीचे किल्ले बघायला मिळतात. अलीकडे आपल्याकडेही किल्ले बांधणीच्या स्पर्धा आयोजित केल्या जातात. मुलांच्या क्रिएटिव्हिटीला भरपूर वाव आणि इतिहासाचा सहज अभ्यास याद्वारे होतो. शिवाय मातीशी नातं घडून येतं. याच बीजरूपी संकल्पनातूनच उद्याचे विश्व साकार होईल.! म्हणून घरच्या बालराजाला त्याचं राज्य घडवू द्या..!

-प्रा रवि आत्माराम बाविस्कर 

।।फक्तइतिहास।।

Comments

Followers चला माझ्यासोबत इतिहासाच्या वाटेवर..

Popular Posts