Skip to main content

Featured

कनकादित्य सूर्य मंदिर कशेळी

मित्रांनो, दिवाळीच्या सुट्ट्यांमध्ये कोकणच्या निरागस आणि दिव्यभूमीला स्पर्श करण्याचा योग आला. आदित्य म्हणजे सूर्य. तसे सूर्य मंदिर भारताबाहेरही आढळतात. त्यापैकी भारतात ओडिशा राज्यातील कोर्णाकचे सूर्यमंदिर तर जगप्रसिद्ध आहेच. त्याचबरोबर सौराष्ट्रात (गुजरात) वेरावळ बंदराजवळ प्रभासपट्टण येथे फार प्राचीन सूर्यमंदिर आहे. १२९३ मध्ये अल्लाउद्दीन खिलजी सौराष्ट्रावर चाल करून आला. त्या वेळी प्रभासपट्टणच्या सूर्यमंदिरात वेगवेगळ्या आसनांवर बसलेल्या बारा सूर्यमूर्ती होत्या जे बारा महिन्याचे प्रतिक होते. हल्ल्याची आगाऊ बातमी मिळाल्यामुळे तेथील पुजाऱ्याने दक्षिणेकडे जाणाऱ्या वेरावळच्या एका व्यापाऱ्याच्या गलबतावर त्यातील काही मूर्ती चढवल्या व तो व्यापारी त्या मूर्ती घेऊन दक्षिणेकडे निघाला. फक्त येथील परिस्थिती शांत झाल्यावर तू त्या मूर्ती परत आन अशी सूचना पुजारीने त्या व्यापाऱ्याला सांगितले. ते गलबत कशेळी गावाच्या समुद्रकिनाऱ्यापाशी आले असता अडकले, पुढे जाईना भरपूर प्रयत्न केले पण जहाज काय जागचे हलेना शेवटी त्या व्यापाऱ्याच्या मनात आले की, कदाचित देवाची येथेच राहण्याची इच्छा आहे. म्हणून त्याने एक मूर्...

सातशतक ग्रंथातून रामस्तुती..



सातशतक या दिव्य ग्रंथाची रचना करताना छत्रपती शंभुराजे म्हणतात..

सीता पग नष चंद की भजि कै संभ समाज ।

सातशतक ग्रंथहि रच्यो,संतन के हित काज ॥

अर्थात: सीतेच्या चरणाच्या नखचंद्रास आराधून शंभु राजांनी समाजाच्या व साधूसंताच्या हितासाठी सातशतक ग्रंथाची निर्मितीकेली आहे. शंभुराजे म्हणतात की माझे मन संताच्या हितासाठी भ्रमर झाले आहे.

मो मन मधुकर संत हित भऱ्यो ग्रंथ रसविंद ।

चित्रकूट के सिर्लान जे फूल पग अरविंद ॥

अर्थात छत्रपती शंभुराजे म्हणतात: 

यात चित्रकुटमधील प्रभु राम, सीता आणि लक्ष्मण यांच्या पवित्र चरणाच्या प्रभावाने जे पारिश्रमिक फूल तेथील दगडावर फुलले तोच हा प्रेम रस होय.

सो रस पाइ छके महा सनकादिक सुक सेस ।

संभराज षगराज ,मुनि ,गिरजा ,गिरा गणेश ॥

अर्थात छत्रपती शंभुराजे म्हणतात: तो रस प्राशन करून शुक्राचार्य, शेषदेव, सनकादिक मुनि तसेच खगराज गरूड, गिरीवरकन्या पार्वतीदेवी, सरस्वती, गणेश तसेच शंभुराजे संतुष्ट झाले.

उपालंभ कहि विनैकहि, जगत सीष कहि ध्यान ।

बह्म निरूपम कुछ कहरो,जाते बाढत ग्यान ॥

अर्थात छत्रपती शंभुराजे म्हणतात:  उपहासात्मक बोलण्यापेक्षा जगाच्या शिकवणुकीकडे माझे लक्ष आहे. काही ब्रह्मनिरूपणात्मक सांगण्याची माझी इच्छा आहे, त्यामुळे ज्ञानवृध्दिही वाढते.

- छत्रपती शंभुराजे कृत सातसतक

छत्रपती शंभूराजांच्या अंतकरणातील दिव्य भाव या शब्द रूपाने प्रकट होतात. यातून एका वीर योद्धाच्या अध्यात्मिक मनाची थोरवी प्रकटते.

।।फक्तइतिहास।।

Comments

Post a Comment

... मग कशी वाटली पोस्ट

Followers चला माझ्यासोबत इतिहासाच्या वाटेवर..

Popular Posts