Skip to main content

Featured

कनकादित्य सूर्य मंदिर कशेळी

मित्रांनो, दिवाळीच्या सुट्ट्यांमध्ये कोकणच्या निरागस आणि दिव्यभूमीला स्पर्श करण्याचा योग आला. आदित्य म्हणजे सूर्य. तसे सूर्य मंदिर भारताबाहेरही आढळतात. त्यापैकी भारतात ओडिशा राज्यातील कोर्णाकचे सूर्यमंदिर तर जगप्रसिद्ध आहेच. त्याचबरोबर सौराष्ट्रात (गुजरात) वेरावळ बंदराजवळ प्रभासपट्टण येथे फार प्राचीन सूर्यमंदिर आहे. १२९३ मध्ये अल्लाउद्दीन खिलजी सौराष्ट्रावर चाल करून आला. त्या वेळी प्रभासपट्टणच्या सूर्यमंदिरात वेगवेगळ्या आसनांवर बसलेल्या बारा सूर्यमूर्ती होत्या जे बारा महिन्याचे प्रतिक होते. हल्ल्याची आगाऊ बातमी मिळाल्यामुळे तेथील पुजाऱ्याने दक्षिणेकडे जाणाऱ्या वेरावळच्या एका व्यापाऱ्याच्या गलबतावर त्यातील काही मूर्ती चढवल्या व तो व्यापारी त्या मूर्ती घेऊन दक्षिणेकडे निघाला. फक्त येथील परिस्थिती शांत झाल्यावर तू त्या मूर्ती परत आन अशी सूचना पुजारीने त्या व्यापाऱ्याला सांगितले. ते गलबत कशेळी गावाच्या समुद्रकिनाऱ्यापाशी आले असता अडकले, पुढे जाईना भरपूर प्रयत्न केले पण जहाज काय जागचे हलेना शेवटी त्या व्यापाऱ्याच्या मनात आले की, कदाचित देवाची येथेच राहण्याची इच्छा आहे. म्हणून त्याने एक मूर्...

युद्धाची बारूद तीही शत्रूच्या शिबिरात""



मित्रांनो,
सन १९०७/८ मध्ये सावरकरांनी लंडनमध्ये अनेक कागदपत्रांचा अभ्यास करून तेथेच स्वातंत्र्याचा जंग अखंड प्रज्वलीत ठेवण्यासाठी भारतीय क्रांतिकारकांसाठी एक बारूद निर्माण केली, ती म्हणजे-
'अठराशे सत्तावनचे स्वातंत्र्यसमर' हा ग्रंथ.
मात्र मुद्रण स्वातंत्र्याचा उद्घोष करणाऱ्या ब्रिटीश राज्यकर्त्यांनी त्यावर मुद्रणापूर्वीच बंदी घातली, आणि ती कायम असताही ज्याचे मुद्रण आणि गुप्त प्रसारण श्रीमती कामा, लाला हरदयाळ, हुतात्मा भगतसिंग, महानायक नेताजी सुभाषचंद्र आदि रणयोद्यांनी केले तो 'अठराशे सत्तावनचे स्वातंत्र्यसमर' हा ग्रंथ क्रांतिकारकांना अखंड स्फूर्ती देणारा व भारतीयांस संघटीत करणारा मंत्र ठरला, लढण्यासाठी बारूद ठरला.
सशस्त्र क्रांतीबद्दल स्वातंत्र्यवीर सावरकर म्हणतात-
सशस्त्र क्रांतीचा मार्ग पूर्णपणे अव्यवहार्य, अशक्य नि हास्यास्पद आहे, एवढेच नव्हे तर तो आत्मघातकीही ठरेल असे सांगणाऱ्या लोकांना माझे उत्तर असे की इंग्रजांच्या हाताखाली असलेल्या त्या आपल्या भारतीय सैनिकांच्या हाती जी शस्त्रें आहेत ती आपलीच आहेत. ते सैनिक अशिक्षित असले तरी त्यांच्यातही स्वातंत्र्याची इच्छा असलीच पाहिजे. ती त्यांच्या अंत:करणातील स्वातंत्र्याची ज्योत प्रज्वलीत करा नि मग पहा परक्या इंग्रजांवरच तीच शस्त्रे कशी उलटतील ते ."
आणि सावरकर म्हणतात तसे चाळीस वर्षांत ही ज्योत प्रज्वलीत झाली तेव्हा दुसऱ्या महायुद्धात भारतीय सैन्य बंड करून उठलेच..!

सन १९५२ मध्ये 'अभिनव भारत' या आपल्या सशस्त्र क्रांतिकारक संघटणेचा सांगता समारंभ, ध्येयपूर्ती समारंभ पूणे येथे साजरा करताना त्या वेळी सावरकर म्हणाले-
"ब्रिटन देश जरी वाचला तरी त्या दोन महायुद्धांच्या माऱ्याखाली ब्रिटनच्या साम्राज्यशक्तीचा आणि उन्मत्तपणाचा चक्काचूर झाला..!
अर्थात..
अफाट अमुची ध्येयसक्ती..!
स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या ज्वलंत स्मृतीस कोटी-कोटी प्रणाम !!!
||फक्तइतिहास||

Comments

  1. Really sir u r description about maharastras history was really helpful .....kindly I supports u ...=PB

    ReplyDelete

Post a Comment

... मग कशी वाटली पोस्ट

Followers चला माझ्यासोबत इतिहासाच्या वाटेवर..

Popular Posts