Skip to main content

Featured

कनकादित्य सूर्य मंदिर कशेळी

मित्रांनो, दिवाळीच्या सुट्ट्यांमध्ये कोकणच्या निरागस आणि दिव्यभूमीला स्पर्श करण्याचा योग आला. आदित्य म्हणजे सूर्य. तसे सूर्य मंदिर भारताबाहेरही आढळतात. त्यापैकी भारतात ओडिशा राज्यातील कोर्णाकचे सूर्यमंदिर तर जगप्रसिद्ध आहेच. त्याचबरोबर सौराष्ट्रात (गुजरात) वेरावळ बंदराजवळ प्रभासपट्टण येथे फार प्राचीन सूर्यमंदिर आहे. १२९३ मध्ये अल्लाउद्दीन खिलजी सौराष्ट्रावर चाल करून आला. त्या वेळी प्रभासपट्टणच्या सूर्यमंदिरात वेगवेगळ्या आसनांवर बसलेल्या बारा सूर्यमूर्ती होत्या जे बारा महिन्याचे प्रतिक होते. हल्ल्याची आगाऊ बातमी मिळाल्यामुळे तेथील पुजाऱ्याने दक्षिणेकडे जाणाऱ्या वेरावळच्या एका व्यापाऱ्याच्या गलबतावर त्यातील काही मूर्ती चढवल्या व तो व्यापारी त्या मूर्ती घेऊन दक्षिणेकडे निघाला. फक्त येथील परिस्थिती शांत झाल्यावर तू त्या मूर्ती परत आन अशी सूचना पुजारीने त्या व्यापाऱ्याला सांगितले. ते गलबत कशेळी गावाच्या समुद्रकिनाऱ्यापाशी आले असता अडकले, पुढे जाईना भरपूर प्रयत्न केले पण जहाज काय जागचे हलेना शेवटी त्या व्यापाऱ्याच्या मनात आले की, कदाचित देवाची येथेच राहण्याची इच्छा आहे. म्हणून त्याने एक मूर्...

महाराजांनी औरंगजेबास सांगितलेले एक अनमोल तत्वज्ञान...



मित्रहो, लंडनच्या राॅयल एशियाटिक सोसायटीच्या ग्रंथात एक फारसी हस्तलिखित आहे. या ग्रंथाचे नाव " खुतूते शिवाजी " म्हणजे शिवाजीची पत्रे असे आहे. या हस्तलिखिताची आणखी एक प्रत कलकत्ता येथील एशियाटिक सोसायटीत आहे.  सर जदुनाथ सरकार यांनी त्याची प्रत तयार करून आपल्या संग्रही ठेवली. तीची फोटो प्रत मुंबई च्या सरकारी दफ्तरखान्यात बघावयास मिळते. त्यात अशी बत्तीसपत्रे आहेत.

मोदींनी विश्व सुफी संम्मेलनात जो जगाला उपदेश दिला तो छत्रपतींनी ३४७ वर्षांपूर्वी दिला होता.
सन १६७९ मध्ये औरंगजेब बादशहाने हिंदु प्रजेवर जिझिया कर लादला होता. त्याच्या निषेधार्थ शिवाजीमहाराजांनी औरंगजेबास एक पत्र लिहले ते मोठे महान तत्वज्ञानाचे आहे. महाराज म्हणतात-

.....एक हितचिंतक म्हणून मी आपणांस सांगत आहे.
नुकतेच माझ्या कानावर अाले आहे की, माझ्यावरील मोहिमांमुळे आपला खजीना रिता होत चालला आहे. तो भरून काढण्यासाठी आपण हिंदूंवर जिझिया कर लादला आहे.
बादशहा सलामत, आपल्या साम्राज्याचा संस्थापक अकबर, जहांगीर व शहाजहान यांनी सर्व जमातीशी शांततेने व समभावाने वागन्याचे उत्कृष्ठ धोरण स्विकारले म्हणूनच त्यांची भरभराट झाली.
बादशहा सलामत, कुराणात परमेश्वरास रब्बुल आलमिन (विश्वनाथ) म्हणटले आहे.रब्बुल मुसलमिन(मुसलमानांचा नाथ) नव्हे.
हिंदू आणि मुसलमान म्हणजे त्या दैवी संपदेचे दोन अविष्कारच..परमेश्वराने निर्माण केलेल्या या चित्रावर रेघोट्या ओढू पाहणे म्हणजे त्या चित्रकारावर(परमेश्वरावर) दोषारोपन करणे होय...
धार्मीक द्वेश बाळगणारा आणि कट्टरपणा दाखविणारा प्रत्येकजण हा परमेश्वराच्या आदेशाची अवज्ञा करणारा होय.

असे हे पत्र बादशहाच्या दांभिकपणावर परखड मत व्यक्त करणारे व कानउघडणी करणारे असून मोठे गंभिर तत्वज्ञान व निर्भेळ सत्य यात दडलेले आहे.
संदर्भ- खुतूते शिवाजी/सेतूमाधव पगडी खं.३

||फक्तइतिहास||

Comments

Followers चला माझ्यासोबत इतिहासाच्या वाटेवर..

Popular Posts